मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. राज्यभरात विविध उपक्रमांसह मर्दानी खेळ, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात ही शिवजयंती साजरी केली जाते. फक्त देशात वा राज्यातच नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती प्रदेशात देखील उत्साहात साजरी केली जाते.
मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच आयोजनाची तयारी झाली आहे. मात्र, बुधवारी राज्यातील कोरोना रुगणांचा आकडा वाढल्यामुळे गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.
यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘छत्रपतींच्या महाराष्ट्रातच शिवजयंतीवर निर्बंध यावेत, याहून दुर्दैव नाही. महाविकास आघाडीतील पक्षांचे मेळावे राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. राष्ट्रवादीची संवाद यात्रा देखील सुरु आहे, मग शिवजयंती साजरी करण्यावर हे बंधने का ? ‘ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराजांवर जनता प्रेम करते. महाराजांवरील निष्ठा जपत शिवभक्तांनी स्वतःहून योग्य ती काळजी घेऊन हा उत्सव साजरा केला असता.’ अशी प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर केवळ राज्यपालांना विमान नाकारणं अहंकार कसा होऊ शकतो’
- पवार साहेब आरक्षणाबाबत लक्ष घाला, अन्यथा उद्रेक होईल : उदयनराजे भोसले
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारचे निर्बंध ! वाचा कशी आहे नियमावली
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
