Share

महावितरणच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षीय मुलीचा वीजेचा शॉक लागुन मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

बीड : परळी शहरात वडार कॉलनीच्या मागे शिवनगर येथे महावितरण चे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या मागील बाजुस विजेच्या खांबात मागील दोन महिन्यांपासुन विद्युत प्रवाह उतरला होता. या विषयी परिसरातील अनेक नागरिकांनी अनेकदा तक्रार केली पण महावितरणने याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. पण मंगळवारी याच विजेचा शॉक लागून एका मुलीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या दोन तासात बिघाड शोधून दुरुस्ती करण्यात आली.

या भागातील सहा वर्षाची चिमुकली गौरी वैजनाथ घोटकर मंगळवारी या भागात खेळत असताना तिचा त्या खांबाला स्पर्श झाला आणि खांबाला चिकटून तिला जबरदस्त शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला. चिमुकलीचा जीव गेल्यांनतरच वीज कंपनीला जाग आली आणि दोनच तासांत बिघाड शोधुन दुरुस्ती करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर संतप्त नातेवाइकांनी बालिकेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सतंप्त नागरिक व नातेवाइक थेट संभाजीनगर पोलिस ठाण्यात एकत्र आले. त्यांनी बालिकेच्या मृत्यूप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली.

या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली जाणार आहे असे परळी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत आंबेडकर यांनी सांगीतले. रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबात मागील दोन महिन्यांपासून वीज प्रवाह उतरत होता. या खांबाजवळून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांना किरकोळ वीजेचा शॉक बसले. त्यामुळे नागरिक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व या भागातील लाइनमनला सांगत होते. परंतु, कोणतीच दुरुस्ती होत नव्हती. वेळीच दुरुस्ती केली असती तर जीव वाचला असता असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!