Share

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने आख्ख गाव गेलं वाहून; भारतीय क्रिकेटर्सनी केली प्रार्थना

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : उत्तराखंड राज्यातील चामोली जिल्ह्यात रविवारी (०७ फेब्रुवारी) अतिशय भयावह घटना घडली. या जिल्ह्यातील रेणी गावातील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर (हिमकडा) कोसळले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने चामोलीपासून ते हरिद्वारपर्यंतची कित्येक घरे वाहून गेली आहेत. प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून मदत व बचावकार्य सुरू आहे.

तर, ऋषीगंगा प्रोजेक्टचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा नदीत मोठा हिमकडा कोसळल्याने या नदीला महापूर आला आहे. तसेच धरणाचा बांध फुटल्याने नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेकडो लोक बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे.

आतापर्यंत रेणी गावातील १० लोकांचे मृतदेह सापडले आहेत. अजून कमीत कमी १००-१५० लोकांचा मृत्यू झाला असल्याची भीती आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटूंनी या शोकांतिकेबद्दल दुख: व्यक्त केले आहे. माजी भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवाग, सुरेश रैना आणि अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी ट्विटरद्वारे पीडित लोकांसाठी प्रार्थना केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!