Share

भारत-युकेमधील विमानसेवा पुन्हा सुरु होणार; केंद्र सरकारचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका मात्र कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. अस असली तरीही पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहेच. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून होता.

यामुळे ब्रिटनहून भारतात येणारी आणि भारतातून बाहेर जाणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. २३ डिसेंबर पासून ही हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती. यानंतर, सुरुवातीला 31 डिसेंबरपर्यंत असलेली ही विमान उड्डाणांवरची बंदी आणखी वाढवण्याचाही निर्णयही झाला. ७ जानेवारीपर्यंत ही हवाईसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता ही बंदी उठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 8 तारखेपासून भारत आणि यूकेदरम्यानची विमानसेवा सुरू होईल. 23 जानेवारीपर्यंत फक्त आठवड्याला 15 उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद इथून यूकेला जाणारी फक्त 15 विमानं दर आठवड्याला उडू शकतील, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!