🕒 1 min read
औरंगाबाद- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही
आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.
आम्हाला सत्ता सुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंलय.
दरम्यान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विधानावर औरंगाबाद मनसे जिल्हा प्रमुख सुहास दशरथे यांनी निषेध व्यक्त केला आहे. याच बरोबर ‘शिवसेना सत्तेची लाचारी पत्करतो, की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंमत देतो’ हे येत्या काळात कळेलच असेही ते म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असुन, औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर का होत नाही. असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे.२६ जानेवारी पर्यंत नामांतर झाले नाही तर मनसे मोठे आंदोलन उभारेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे ठामपणे उभे आहेत : शिवराज सिंह चौहान
- भारताने शेवग्याच्या पावडरीची जागतिक मागणी लक्षात घेऊन त्याच्या निर्यातीचा केला आरंभ
- भारताचे दिग्गज हॉकीपटू मायकल किंडो यांनी घेतला अखेरचा श्वास
- साईनगरीत भाविकांकडून बाबांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाचे स्वागत
- केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 लस वितरणासाठी सज्ज रहाण्यास सांगितले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
