Share

मराठा समाजात काही जण आहेत जे NCP च्या पगारावर आहेत : निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यामुळे आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या एसईबीसी उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी होऊ शकेल. त्याकरता त्यांना आर्थिक मागास घटकासाठीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

त्याबाबत आता भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतीत वक्तव्य केलं आहे. मराठा समाजाने EWS चे प्रमाणपत्र स्वीकारा सांगून ठाकरे सरकारने मराठा समाजाचा अपमान केला आहे. मराठा समाजात काही जण आहेत जे NCP च्या पगारावर आहेत त्यांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे. १० टक्क्यात काय मिळणार मराठा समाजाला??असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWSचा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. EWS आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवालही संभाजीराजे यांनी केलाय. जर आर्थिक मागास वर्गाच्या सवलतीमुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असं त्यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या बाजूला मराठा समाजाची मागणी नसताना वैयक्तिक याचिकेचा आधार घेऊन मराठा समाजाचा EWS मध्ये समावेश करून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.श्रीमंत कोकाटे, विकास पासलकर, राहुल पोकळे, राजेंद्र कुंजीर आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत पुण्यात भुमिका मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!