🕒 1 min read
मुंबई : अजित पवार यांची स्वतःची काहीही ताकद नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे त्यांना किंमत आहे, असं मत निलेश राणे यांनी व्यक्त केलं. तसेच अजित पवार यांनी बाता मारु नये, ते स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही. यावेळी त्यांनी आघाडी सरकार आल्यानंतर अजित पवार 1 वर्षभर शांत का बसले होते, असा सवालही केला.
राणे म्हणाले, “अजित पवार यांची स्वतःची ताकद काहीही नाही. बारामतीत जी ताकद आहे ती शरद पवार यांची आहे. शरद पवार यांनी बारामतीत ताकद निर्माण केली आणि टिकवली. अजूनही शरद पवार यांचं तिथं लहानलहान गोष्टींवर लक्ष असतं, त्यांचा पहारा असतो. अजित पवार यांनी त्यातील काहीही केलेलं नाही. त्यामुळे मी निवडून देतो असं श्रेय ते घेऊ शकत नाही. ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात अजित पवारांमुळे निवडून आला असा एकही आमदार नाही. त्यामुळे अजित पवार यांनी मोठमोठ्या वार्ता करु नये.”
राणे म्हणाले,“अजित पवार यांनी घोटाळे, सिंचन, बँका, घाणेरडी वक्तव्यं असं जे चित्र महाराष्ट्राला दाखवलं आहे ते महाराष्ट्र विसरलेला नाही. ते 5 वर्ष गप्प राहून मंत्रिपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार स्वतःच्या ताकदीवर एक साधा ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही.”
“अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप आणि घाणेरड्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात”
राणे म्हणाले,“अजित पवार मागील 1 वर्ष काहीच बोलले नाहीत, आत्ता कुठंतरी बोलायला लागलेत. आघाडी सरकारला 1 वर्ष झाल्यानंतर लोकं मागचं विसरली असं त्यांना वाटत असेल. ते आज दुसऱ्या पक्षातील आमदारांना बोलावत आहेत, पण त्यांना 1 वर्षापूर्वी स्वतःच्या पक्षातील आमदार टिकवता आले नाहीत. अजित पवार यांचा इतिहास पाहिला तर लोकोपयोगी वास्तू किंवा कार्यक्रम दिसणार नाहीत.”
“भ्रष्टाचाराचे आरोप आणि वेगवेगळी वक्तव्ये यावरच ते चर्चेत असतात. ते समाजोपयोगी कामासाठी चर्चेत नसतात. त्यांना स्वतःच्या पक्षातील आमदार न टिकवता आल्याने तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार सोडावं लागलं. ज्यांच्याकडे एकही आमदार राहायला तयार नव्हता ते अजित पवार आम्हाला आजही आठवतात,” असंही राणेनी नमूद केलं.
महत्वाच्या बातम्या
- त्या’ व्हायरल व्हिडिओवर चौकशी दरम्यान करणचे अजब उत्तर
- मुंबईत अंबानी-अदानी विरोधात निघणार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा
- राष्ट्रीय महामार्गावर 1 जानेवारी पासून ‘फास्टॅगची’ अंमलबजावणी
- ASSOCHAM च्या स्थापनेला 100 पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने गौरव
- कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळवायचा आहे ? मग ‘असा’ करा अर्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
