🕒 1 min read
सातारा : नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा पुणे व गेली कित्येक टर्म भाजपचा दबदबा असलेला नागपूर मतदारसंघ देखील यंदा महाविकास आघाडीने स्वतःच्या ताब्यात घेतला आहे.
मात्र, या आघाडीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसलाच झाल्याचं दिसून आलं असून शिवसेनेला मात्र या निवडणुकांमध्ये आपलं खातं देखील उघडता आलं नाही. अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर, भाजप नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. मुख्यमंत्री शिवसेनेचे असताना पक्षाला एकही जागा न मिळाल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत होती.
आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करत जी काही कमी पदवीधर, शिक्षक निवडणुकांमध्ये राहिली होती ती येत्या काळात भरून काढणार असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, ‘पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असले तरी भविष्यकाळात त्याची भरपाई करणार आहे.’ त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला असता ही प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बालहट्टापोटी सरकारचे साडेपाच हजार कोटी खड्ड्यात; राम कदमांची टीका
- केवायसी पडताळणीसाठी आलेले कॉल करू शकतात तुमचे खाते रिकामे ‘या’ बँकेने दिला इशारा !
- रयतच्या बड्या अधिकाऱ्याचा पुण्यात राजीनामा; परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात
- भामा-आसखेडचं पाणी भाजपात अंतर्गत संघर्ष पेटवणार ?, अनिल टिंगरेंचा आंदोलनाचा इशारा
- ‘जो ओवैसीला खरेदी करु शकेल असा कोणी अजून जन्माला नाही आला’


