Share

‘वीजबिल माफीवरून काँग्रेसने ठाकरे सरकारला शॉक द्यावा’; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : राज्यात सद्या विज बिल माफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वाढीव विजबिलात दिवाळीमध्ये गोड बातमी दिली जाईल असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अचानक युटर्न घेत विज बिल भरावेच लागेल असं म्हणल्यामुळे अव्वाच्या-सव्वा बिल आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाने, व्यावसायिकांनी भरायचं तरी कसं असा उद्विग्न प्रश्न निर्माण झाला आहे.

परिवहन खात्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पॅकेज दिलं तर मग वीजबिलात सरकार का दिलासा देऊ शकत नाही? यासाठी भाजप, मनसेसह इतर पक्षांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ऊर्जा खातं काँग्रेस पक्षाकडे तर परिवहन खातं शिवसेनेकडे असल्याने हा दुजाभाव होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.

आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. ‘वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचं घूमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर काँग्रेसने महाविकास आघाडीला शॉक दिलाच पाहिजे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून जनतेत रोष आहे. राज्यातील पाच कोटी ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेसने जनतेसोबत राहावं. हे सरकार काँग्रेस आमदारांच्या भरवशावर आहे. त्यामुळे वीजबिल माफीसाठी काँग्रेसने या सरकारवर दबाव निर्माण करावा,’ अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!