🕒 1 min read
नाशिक : राज्यात सद्या विज बिल माफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वाढीव विजबिलात दिवाळीमध्ये गोड बातमी दिली जाईल असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अचानक युटर्न घेत विज बिल भरावेच लागेल असं म्हणल्यामुळे अव्वाच्या-सव्वा बिल आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाने, व्यावसायिकांनी भरायचं तरी कसं असा उद्विग्न प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य सरकारने वाढीव वीजबिल माफ करण्यासोबतच टाळेबंदी काळातील वीजबिलात सवलत द्यावी, या मागणीसाठी भाजप, मनसेसह इतर अन्य पक्ष देखील तीव्र आक्रमक झाले असून मनसेने राज्य सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर, भाजपने प्रकाशगडावर महिलांसह धडक मोर्चा काढला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु असलेला पाहायला मिळत आहे.
यावरून विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी मागील फडणवीस सरकारवरच गंभीर आरोप करत पलटवार केला आहे. ‘ मागील सरकारनं महावितरणचे 67 हजार कोटी रुपये थकवल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रावरील वाढीव वीज बिलाचं हे संकट भाजपनेच आणल्याचा आरोप केला आहे.’
दरम्यान , शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महावितरणच्या आर्थिक तोट्याला भाजपला जबाबदार धरलं आहे. “विजेमध्ये झालेला तोटा हा भाजपच्या सरकारच्या काळातला आहे. तो त्यांनी वसूल करुन द्यावा. त्यानंतर भाजपने आरोप करावा” असं राऊतांनी सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपात किंवा सायबर हल्ला नसल्याचे चौकशीत स्पष्ट
- शरद पवारांसामोरच आशिष शेलारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख…
- फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही चितपट करू; जयंत पाटलांनी ठोकला शड्डू
- कोरोनाची दुसरी लाट आली तर महाराष्ट्रातील सर्वांनाच महागात पडेल, राजेश टोपेंचा इशारा
- ‘…त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही’ : बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

