Share

‘…त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही’ : बाळासाहेब थोरात

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : परिवहन खात्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पॅकेज दिलं तर मग वीजबिलात सरकार का दिलासा देऊ शकत नाही? यासाठी भाजप, मनसेसह इतर पक्षांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ऊर्जा खातं काँग्रेस पक्षाकडे तर परिवहन खातं शिवसेनेकडे असल्याने हा दुजाभाव होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार केली आहे. तर, सरकार आर्थिक अडचणीत आहे. दर महिन्याला 12 हजार कोटींचं कर्ज काढावं लागतंय, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं होतं.

यानंतर आज त्यांनी याबाबत थोरातांनी अधिक भाष्य करत खुलासा केला आहे. ‘कोरोनावर खर्च होत असल्यामुळे सरकारी तिजोरीतील निधी कमी पडतो. सध्या पैशांची आवकही कमी आहे आणि खर्च जास्त आहेत. त्यामुळे काही खात्यांना निधी कमी पडत असल्याचे’ त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेसला मान-सन्मान दिला जात नाही अशा चर्चा सुरु होत्या. याआधी देखील काँग्रेस मंत्र्यांसह काही आमदारांची नाराजी असल्याचे समोर आले होते. मात्र, यासर्व चर्चांमधील तथ्य फेटाळून लावत, ‘आमच्यात काही वाद नाहीत, काँग्रेस पक्षही कोणावर नाराज नसल्याचे’ देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!