Share

सत्तेसाठी भाजपने नाही तर शिवसेनेनेच विश्वासघात केला – फडणवीस

Published On: 

मुंबई : भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षनेत्याच्या जबादारी सोबतच बिहारमधील प्रचाराची जबाबदारी देखील पार पडली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सद्या त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

बिहारमध्ये भाजपने जेडीयूसोबत निवडणूक लढवली आणि बहुमताचा आकडा गाठला. तेजस्वी यादव यांनी कडवी टक्कर दिली असली तरी भाजपला आपल्या जागा वाढवण्यात यश आल्यानंतर अनेक नेत्यांनी याचं श्रेय बिहार निवडणुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना दिलं आहे.

यानंतर, विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निकालांच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ झाला आहे. त्यामुळे जास्त जागा मिळाल्यातरी मुख्यमंत्री हे नितीशकुमारचअसतील असतील असं भाजपने जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिला होता आणि आम्ही तो पाळणार आहोत” असं देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. तर, “महाराष्ट्रात असा कुठलाही शब्द आम्ही दिला नव्हता. सत्तेसाठी भाजपने नाही तर शिवसेनेने विश्वासघात केल्याचा” आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!