🕒 1 min read
रत्नागिरी : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.
बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेने देखील आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळालं. कित्येक मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. अशातच शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून भाजपला चिमटा काढत असलेले पाहायला मिळालं.
भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत यावरून संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. “संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात, शिवसेनेचा पराभव जसा बाहेर होतो, तसा महाराष्ट्रात होण्यास वेळ लागणार नाही, याची मला खात्री आहे,” असा टोला निलेश राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांना लगावलाय.
शिवसेनेची लायकी काय होती हे आम्हाला माहिती होतं. संजय राऊत विसरले होते, गोव्यामध्ये ही तसेच झालं होतं. गोव्यामध्ये सर्व मिळून 900 मते शिवसेनेला मिळाली होती, असा घणाघात देखील त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप होणाऱ्या MIMची बिहारमध्ये जोरदार मुसंडी
- ‘मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे १५ दिवसांचे अधिवेशन घ्या’
- ‘या’ खास निमित्ताने सोशल मीडियावर दीपिकाने बदललं आपल नाव…
- ‘नाईक कुटुंबियांबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं’
- ‘औरंगाबादचं नाव बदलण्याने काय साध्य होणार, अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं’ – कोल्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
