Share

मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- हाथरस प्रकरणाबाबत देशात तीव्र संताप वाढला चालला आहे. या प्रकरणावरून योगी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. योगी सरकारने कुणाच्या आड लपून राजकारण करणे थांबवून आणि ज्या ठिकाणी आपले सरकार आहे, तिथेली माता भगिनींना सुरक्षित वातावरण दिले तर ते अधिक गरजेचं राहिल, असा सल्ला विरोधक आता भाजपला देऊ लागले आहेत.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हाथरस सामूहिक बलात्कारासारख्या घटनांना बेरोजगारी जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.काटजू यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर आता टीका देखील होत आहे.

पुरुषांमध्ये शारीरिक संबंधांची नैसर्गिकरित्या तीव्र इच्छा असते. पण बेरोजगारी आहे आणि ती वाढत जात आहे. त्यामुळे तरूणांचे विवाह होत नाहीत. यामुळेच सामान्य गरज असलेल्या वयात येऊनदेखील मोठ्या प्रमाणात तरूण शारीरिक गरजेपासून वंचित राहतात, असं मार्कंडेय काटजू यांनी म्हटलं आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा मी निषेध करतो आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याचंही मी आवाहन करतो, असं मार्कंडेय काटजू यांनी म्हटलंय.

“आपण बलात्काराच्या घटनेला योग्य ठरवत नाही तर त्याचा निषेधच करत आहोत. परंतु आज देशात जी परिस्थितीत आहे त्यावरून त्या वाढणं हे निश्चितच आहे. जर देशात अशा घटना कमी करायच्या असतील तर सामाजाकि आणि आर्थित व्यवस्था अशी करावी लागेल ज्याठिकाणी बेरोजगारी अतिशय कमी असेल,” असंही काटजू यांनी नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!