🕒 1 min read
मुंबई- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील,असा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेसने दिला आहे.
तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस कार्यकर्तेही भाजप नेत्यांची कॉलर धरू शकतात. तेवढी ताकद त्यांच्यात आहे. पण आमची ती संस्कृती नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला तशी शिकवण दिलेली नाही. आम्ही गांधी विचारधारेवर विश्वास ठेवून लोकशाही मार्गाने काम करणारी मंडळी आहोत असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे .
दरम्यान,उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील,असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.थोरात म्हणाले की,उत्तर प्रदेशात कायद्याचे नाही तर जंगलराज आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशात महिला व मुलींच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत. हाथरस येथील अमानवीय घटनेतील आरोपींनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार करत आहे त्यामुळेच राहुल गांधी गांधी आणि प्रियंका गांधी यांना हाथरस येथे जाऊ दिले जात नाही. काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. भाजप सरकारच्या दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. पीडित कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सरकार विरोधात संघर्ष करत राहील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
शिवसेनेने देखील यावर प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांना मिळालेल्या वागणुकीचा निषेध करतो, असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यसेवा परीक्षांसंदर्भात संभाजीराजेंची महत्वाची मागणी
- पुणे जिल्हयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त
- आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात,आता तरी चाचण्या वाढवा!
- नागपुरात आता आयव्हीपआर सिस्टीमद्वारे साधला जाणार कोरोना बाधितांशी संपर्क
- भाजपच्या सरकारच्या दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही : थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
