🕒 1 min read
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी मुंबई बंद पाडली. मंगळवारी मध्यरात्रीसह बुधवारी पहाटे पावसाचा जोर कायम राहिल्याने रस्ते, रेल्वे आणि ठिकठिकाणी पाणी साचले. याचा विपरित परिणाम रस्ते वाहतूकीसह रेल्वे वाहतूकीवर झाला. त्यामुळे भल्या पहाटेच या दोन्ही सेवा कोलमडल्या. या व्यतिरिक्त अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः भलया पहाटे कार्यालय गाठणा-या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. बुधवारी सकाळसह दुपारी हा पाऊस लागून राह्ल्याने मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली होती.
तर मुंबईच्या पूरसदृश्य परिस्थितीवरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली. संततधार पावसात मुंबईकरांची परवड. महापालिका मख्ख, राज्य सरकार ढिम्म, मुंबईकर बेहाल त्यासाठी दार उघड भावा दार उघड अशा शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली.
पण तरीही ते 'घरी'च.
दार उघड भावा दार उघड…@OfficeofUT @mybmc pic.twitter.com/CrX66hauRZ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 23, 2020
याबाबत अतुल भातखळकर म्हणाले की, मुंबई महापालिकेने रात्रीच्या पावसात पुन्हा एकदा शहर तुंबवून दाखवलं, नालेसफाई टक्केवारी, कोविड सेंटरमधील टक्केवारी, महापौरांवर आरोप, या भ्रष्टाचाराने लडबडलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारामुळे सर्वसामान्य मुंबईकरांवर ही परिस्थिती उद्भवली आहे. उपनगरातील पालकमंत्री आदित्य ठाकरे उपनगराकडे फिरकायला तयार नाही, ते केवळ पर्यटनात आणि ताज महाल हॉटेलच्या करारात रमले आहेत, आतातरी पालकमंत्र्यानी दौरा करावा आणि झोपडपट्टीतील लोकांसाठी प्रत्येक १० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, अरे ला कारे करण्याची आमच्यात धमक; राऊतांची पुन्हा गर्जना
- कृषी विधेयकामुळे शेतक-यांना मिळणार भक्कम पाठबळ, या खासदारांनी व्यक्त केला विश्वास
- अन्यथा अध्यक्षासह ५२ जिल्हा परिषद सदस्य आमरण उपोषणास बसतील, काय आहे प्रकरण
- महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत नाही
- कोल्हापूरातील गोलमेज परिषदेत मराठा समाजाचे ‘हे’ महत्वाचे ठराव!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
