नवी दिल्ली: देशात २४ तासात नव्या ४० हजार १२० रुग्णांची भर पडली आहे. तर ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ४२ हजार २९५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या आकड्यांतून स्पष्ट दिसून येते की, अजूनही देशातील कोरोना लाट ओसरलेली नाही. दरम्यान नव्या कोरोना रीग्नांची भर पडतच आहे.
या आकड्यांमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २१ लाख १७ हजार ८२६ इतकी झाली आहे. दरम्यान देशात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १३ लाख २ हजार ३४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार २२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान देशात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३० हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
India reports 40,120 new #COVID19 cases, 42,295 recoveries & 585 deaths in the last 24 hrs, as per Union Health Ministry.
Total cases: 3,21,17,826
Total recoveries: 3,13,02,345
Active cases: 3,85,227
Death toll: 4,30,254Total vaccinated: 52,95,82,956 (57,31,574 in last 24 hrs) pic.twitter.com/UON8OyTLU5
— ANI (@ANI) August 13, 2021
तर देशभरात आतापर्यंत ५९ कोटी ९५ लाख ८२ हजार ९५६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण ४ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोना कमी होताच नाही तोच देशात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसचेही रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे देशभरात कोरोना अजूनही संक्रमित होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपी संजय राठोड अद्यापही मोकाट कसा?’, चित्रा वाघ यांचा सवाल
- ‘चिक्की घोटाळ्यात अजून गुन्हा का दाखल केला नाही?’, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
- ‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर


