औरंगाबाद : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा परिषदेने 28 कोटी 51 लाखांची तरतूद केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती आता होणार आहे. जिल्हा परिषद बांधकाम समितीची बैठक सभापती किशोर बलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये ३०:५४ व ५०:५४ या शीर्षाअंतर्गत १६ कोटी ७८ लाख व ८ कोटी ५५ लाखांची तसेच तीर्थक्षेत्र विकासासाठी ३ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद करण्याचे निश्चित करण्यात आले.
ग्रामीण भागामधील अनेक रस्ते खराब आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी रस्ते दुरुस्तीचे प्रस्तावही दिलेले आहेत. २४:२५ अंतर्गत १६ कोटी ७.८ लाख, ५०:२४ अंतर्गत ८ कोटी ५५ लाख आणि ‘क’दर्जाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी ३ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद आहे.
बांधकाम समितीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम वाटप होणार आहे. याचे नियोजन करण्यात येत आहे. बांधकाम विभागाकडे असलेलया निधीतून ग्रामीण भागातील कामे होतील, असे सभापती गलांडे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली, पंजाबमध्ये आता गुंडाराज !
- शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, मुनगंटीवारांचे संकेत ?
- ‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही’
- विदर्भातील अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
- मुंबईत लवकरच नाईट लाईफ सुरू करणार : आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
