टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आणि महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या फैलावाला अटकाव घालण्यासाठी सरकारकडून सक्तीचं लॉक डाऊन जाहीर करण्यात आल आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्याला रोजच्या रोज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करत असतात.
आपल्या आजच्या संवादात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागरिकांनी घरातच थांबावे अशी विनंती केली आहे. आपण घरात आपल्या सर्व प्रियजनांसोबत आहेंत हा वेळ आनंदी राहून घालवा. यावेळी त्यांनी घरात विरंगुळा म्हणून कॅरम, पत्ते किवा घायाच्या भेंड्या खेळ असा सल्लाही ही दिला.
आपली यंत्रणा मग ते डॉक्टर्स असतील किवा पोलीस असतील हे अपार कष्ट घेत आहे आहे त्यामुळे आपल्याला हे संकट परतवायच असेल तर नागरिकांनी घरी थांबन गरजेचं आहे. शासनाकडून सर्व व्यवस्था ठेवली जात आहे, आरोग्य सुविधा वाढवण्याच आमच काम सुरु आहे, फक्त तुम्ही घरी थांबा असं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे.
तसेच घराबाहेरील संकटाशी लढाई करायला तुमचं सरकार मजबूत आहे पण तुम्ही घराबाहेर पाउल टाकू नका. अनावश्यक बाहेर पडू नका गरज असेल टर एखाद्यानेच बाहेर पडा. उगाच रहदारी वाढवू नका पोलिसांशी हुज्जत घालू नका. कुटुंबासमवेत वेळ घालावा असेही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

