मुंबई-राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा आशयाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. पण आपण काही झाले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले आहे.
भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची सचिन पायलट भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त सचिन पायलट यांनी फेटाळून लावले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली आहे. काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहण्याची चिन्ह असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्हिप जारी करत काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शंभरहून अधिक आमदार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर आमदार बसने बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी ऑल इज वेल अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, आता या सर्व घडामोडींवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला घोडेबाजाराची सवय आहे, त्यांना पैशाचा उन्मात असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. कर्नाटकात मी हे अनुभवलं आहे. हे सगळं राजकीय संस्कृतीच्या विरोधात आहे. राज्यात दिलदार मुख्यमंत्री आणि शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सराकर स्थिर असल्याचंही त्या म्हणाल्या.’आदरणीय देवेंद्र फडणवीस आमच्या विदर्भातील आहेत. मात्र, त्यांना सत्ता नसलेलं सहन होत नाही’, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर केली.
महत्वाच्या बातम्या-
पुणे व्यापारी महासंघाचा लॉकडाऊनला विरोध मावळला,सहकार्य करण्याचे दिले आश्वासन
संजय राऊतांनी थेट फडणवीसांना दिले आव्हान; पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिम्मत दाखवावी !
गेहलोत सरकारवरील संकट महाराष्ट्रातील ‘हा’ धुरंधर नेता करणार दूर, राजस्थानाकडे रवाना होण्याची सूचना
भारत – नेपाळच्या मैत्रीत चीनने फूट पाडू नये; पुण्यातील नेपाळी नागरिकांच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

