मुंबई : आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार 8 सप्टेंबर रोजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हा सामना पुढील महिन्यात 17 ऑक्टोबर रोजी युएयी मध्ये होणार आहे.
आयसीसीकडून आयोजित या मानाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवड समितीने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ज्यामुळं त्यांचं नशीब फळफळलं आहे. पण, काही खेळाडूंचं स्वप्न मात्र तुटलं आहे. ज्यामध्ये कुलदीप यादवला संधी न दिल्यानं अनेकांनाच धक्का बसला आहे.
भारतीय संघातून धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर कुलदीपच्या करिअरला उतरती कळा लागली. T20 विश्वचषकासाठी कुलदीपची संघात निवड होऊ शकते अशी चर्चा होती मात्र, तसे झाले नाही. कुलदीप सातत्याने संधीच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत कुलदीपच्या गोलंदाजीवरही परिणाम झाला. कुलदीपला ‘चायनामेन गोलंदाज’ म्हणून ओळखल जातं. ही गोलंदाजीची अत्यंत वेगळी पद्धत आहे. ज्यामध्ये गोलंदाज बोटांच्या ऐवजी मनगटानं चेंडूला फिरकी देतो. गोलंदाजीमध्ये सातत्य नसल्यामुळे कुलदीपला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या
- ऊस तोडणी कामगारांनी ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं, युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
- भाजप-संभाजी ब्रिगेड युतीची चर्चा; संतोष शिंदे म्हणाले, ‘वैचारिक लढा चालूच राहील,परंतु…’
- जम्मू काश्मीर पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित; पर्यटन संचालकांनी दिली माहिती
- तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

