🕒 1 min read
नवी दिल्ली : गेले काही दिवस २४ तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसत आहे. गेल्या २४ तासात भारतात ३ लाख ४८ हजार ४२१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार २०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात ३ लाख ५५ हजार ३३८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
देशातील १२ राज्यात १ लाखाहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. ८ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाखादरम्यान सक्रीय रुग्णसंख्या आहे. तर १६ राज्यांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण सक्रिय असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. तर १८७ जिल्ह्यांमध्ये मागच्या दोन आठवड्यात रुग्ण संख्या कमालीची घटल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात करोना रुग्णवाढीचा दर १५ टक्क्याहून अधिक आहे. ८ राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर ५ ते १५ टक्के आहे. तर ४ राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांहून कमी आहे.
187 districts have shown a continued decline in cases since last 2 weeks: Lav Agarwal, Union Health Ministry, Joint Secretary#COVID19 pic.twitter.com/xPMbvS2ZC3
— ANI (@ANI) May 13, 2021
देशातील २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात करोना रुग्णवाढीचा दर १५ टक्क्याहून अधिक आहे. ८ राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर ५ ते १५ टक्के आहे. तर ४ राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांहून कमी आहे. देशात लसीकरण मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत १७ कोटीहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८ वर गेला आहे. आतापर्यंत २ लाख ५४ हजार १९७ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात १ कोटी ९३ लाख ८२ हजार ६४२ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३७ लाख ४ हजार ९९ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १७ कोटी ५२ लाख ३५ हजार ९९१ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लस तर नाही, मग त्या कॉलरट्युन का वाजवत आहात?’ दिल्ली हायकोर्टाने केंद्राला खडसावले
- ‘माझ्यावर बोलणारे वारकरी नव्हे, ते भाजपचे चमचे’, आ.संजय गायकवाडांनी वारकरी संप्रदायाला डिवचले
- आ.संजय गायकवाडांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट
- ‘मुस्लीम प्रोटीनयुक्त आहार घेतात, हिंदूंनीही अंडी-मटन खावे’, आ.संजय गायकवाडांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- ‘स्वाराती’त आणखी एक ऑक्सिजन प्रकल्प सुरू करा, आ.नमिता मुंदडांचे मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

