टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मुळात सर्व परवानग्याच नव्हत्या तर पंतप्रधानांनी जलपूजन कशाला केले, असा सवाल करतानाच हा महाराजांचा अपमान आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
हे सरकार परवानग्या घेत नाही. छत्रपतींचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारले जाते आहे साधा पुतळा उभारला जात नाही हे लक्षात घ्या. सरकार स्मारकाची उंची कमी करते याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. सरकार याबाबत का भूमिका स्पष्ट करत नाही अशी विचारणाही धनंजय मुंडे यांनी सरकारला केली.
सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर या चर्चेत सहभाग घेताना धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
