Share

मागचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे लग्न घरातून रोख, दागिने लंपास

Published On: 

औरंगाबाद : लग्न घरातून चोराने रोख आणि दागिने लांबविल्याची घटना २७ जुलै रोजी सायंकाळी सात ते रात्री बाराच्या दरम्यान सातारा परिसरात घडली. तान्हाजी भाऊराव गायकवाड (५८) यांच्या घरातील मागचा दरवाजा उघडा राहिल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हळदीचा कार्यक्रम सायंकाळी असल्याने घाई गडबडीत गायकवाड कुटुंबिय घराचा पाठीमागील दरवाजा बंद करण्याचे विसरले. त्याचीच संधी साधून चोराने घराच्या आत प्रवेश करत एक तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याचे कानातील दागिने आणि रोख वीस हजाराची रोकड लांबवली.

कार्यक्रम झाल्यानंतर घरी परतलेल्या गायकवाड कुटुंबाला हा प्रकार लक्षात आला.त्यानंतर गुरुवारी गायकवाड यांनी सातारा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!