उस्मानाबाद : अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांना जसा न्याय दिला तसा आम्हाली न्याय द्या, अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातले मृत शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुंटुबियांची आहे. दिलीप ढवळेंसह 16 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून परतफेड न केल्याचामुळे दिलीप ढवळे यांनी 12 एप्रिल 2019 या दिवशी पहाटे पाच वाजता आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी दिलीप यांनी सेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी लिहून आपले आयुष्य संपविले होते.
तेरणा कारखान्याने कर्जापोटी दिलीप ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती. कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांची जमीन लिलावात काढली होती. या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास लावून आपले जीवन संपविले .
ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी दि. १२ एप्रिल रोजी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी हे टोकाचे पाउल उचलले होते.त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली. त्यातून जमिनीवर जप्ती आली. या सर्व त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या शेतकऱ्याने ओमराजे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या नावांचा उल्लेख आहे. याचा संदर्भ देत “आता स्वतःला कराल का अटक ? उद्धव ठाकरे दाखवून द्या न्याय सगळ्यांना एक असतो !” असं ट्विट भाजप नेते, माजी खा. निलेश राणेंनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- गांधी-ठाकरेंच्या सुडबुध्दीचा पर्दाफाश न्यायालयाने केला ; आशिष शेलारांचा गंभीर दावा
- भाजपाचा अजेंडा चालवणाऱ्या अर्णबवरील कारवाईमुळेच भाजपचे आकांडताडंव
- ‘भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे’
- कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी झाली सुरु
- कृषी कायद्याविरोधात कोल्हापुरात काँग्रेस कडून भव्य ट्रक्टर रॅली काढत निदर्शने


