अहमदनगर : आज संपूर्ण राज्य दसऱ्याचा सण साजरा करत असताना अहमदनगर जिल्ह्यात रोहित पवार यांच्या कार्यक्रमाची सध्या चर्चा जोरात होताना दिसत आहे.या मागचे कारण होते ७४ मीटर भगव्या ध्वजाचा अनावरण सोहळा. रोहित पवार यांनी आज या ध्वजाचे लोकार्पण जंगी कार्यक्रम घेऊन केले.
या कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांना आयोजकांनी अक्षरशः हरताळ फासल्याचे दिसून आले. हजारो नागरिकांची गर्दी यावेळी झाल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमात लोकांनी मास्कचा वापर केलेला नसल्याचे दिसत तर आहेच मात्र दस्तुरखुद्द रोहित पवार हे देखील मास्क शिवाय या कार्यक्रमात वावरताना दिसत आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमविल्याने तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती म्हणावी तेवढी बरी नसल्याने या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटत असतांना नगर जिल्ह्यातील चिंता मात्र कायम आहे. परिस्थिती एवढी नाजूक आहे की नगर प्रशासनाने ६१ गावात लॉकडाउन जाहीर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढला होता.
दरम्यान रोहित पवार यांच्या झालेल्या या कार्यक्रमात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली तसेच अनेक लोकांनी मास्कचा वापर केलेला दिसत नाही. आता जर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले तर या सर्वासाठी कोण जवाबदार असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. जर पुन्हा नगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला तर याची जबाबदारी रोहित पवार घेणार का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- किरीट सोमय्यांनी घेतली करमुसेंची भेट, आव्हाडांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?


