Share

एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात रोष वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मात्र, या भेटीवर विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. या भेटीमध्ये अनेक विषयात मराठा आरक्षण हा एक विषय होता मात्र, अद्याप राज्य सरकारने या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल का केली नाही? असा प्रश्न भाजप नेते नीलेश राणे यांनी उपस्थित केलाय.

या संदर्भात नीलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आघाडी सरकारवर टीका केलीय. यामध्ये ते म्हणाले की, ‘मराठा समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी साहेबांना फक्त मराठा आरक्षणासाठी भेटलेले नाही. त्या भेटीमागे ७ ते ८ विषय होते त्यातला एक विषय मराठा आरक्षणाचा होता. एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?? सांगावं.’

मराठा आरक्षण प्रश्नावरुन राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने केला जातोय. त्यातच पदोन्नतीमधील आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा विषय समोर आलाय. त्यामुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झालीय. त्यात आता राज्य सरकार हा विषय केंद्र सरकारकडे टोलवण्याचा प्रयत्न करतेय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!