मुंबई:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला दिल्लीमध्ये हिंसक वळण लागले. या हिंसाचारात अनेक शेतकरी तसेच पोलीससुद्धा जखमी झाले. या चिघळलेल्या परिस्थितीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हात उचला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांचा आकडा 83 असल्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. जखमी पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.
दरम्यान, महाष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्ली आंदोलनाच्या हिसेंचं समर्थन करत आहेत. ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात ह्यांनी एक चकार शब्द काढला नाही. मात्र महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. अरे कुठे फेडाल ही पापं?, अशी घणाघाती टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
तसेच रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत. संजय राऊतांना माझा सवाल आहे की, रोज कोणत्याही विषयावर बोलायला जमतं मग काल देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत?, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा करणार; राज्यमंत्री बनसोडे यांचा निर्धार
- राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मातब्बर नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश!
- विकेल ते पिकेल : रयत बाजाराचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
- आठवलेंच्या उपस्थितीत दुबईत भारतीय उच्चायुक्तालयात 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
- शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणं भाजपला महागात पडेल; गुलाबराव पाटलांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

