🕒 1 min read
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर तोफ दागली आहे. राहुल गांधी मोदीं सरकारवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मनरेगा संदर्भात एक ट्विट करून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
त्यात त्यांनी मनरेगा मजुरांना पैसे काढण्यासाठी होत असलेल्या त्रासावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. मनरेगावर काम करणाऱ्या मजुरांना मजुरीचे पैसे काढण्यासाठी होत समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. या वृत्ताचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर धोरणांवरून टीका केली आहे.
आधी लॉकडाउन लागू केला, कोट्यवधी मजुरांना रस्त्यावर आणलं. नंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या मनरेगाची कमाई बँकांमधून काढणंही अवघड करून ठेवले. मोदी सरकार फक्त बोलण्यापुरतच असून, गरीबांचे अधिकारांची पायदळी तुडवत आहे,’ असे म्हणत राहुल गांधींनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
पहले किया तुग़लकी लॉकडाउन, करोड़ों मज़दूरों को सड़क पर ले आए।
फिर उनके एकमात्र सहारे मनरेगा की कमाई को बैंक से निकालना दूभर किया।
सिर्फ़ बातों की है मोदी सरकार,
कुचल रही ग़रीबों के अधिकार। pic.twitter.com/k24zxYQDyp— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 20, 2020
महत्वाच्या बातम्या
- भाजपाबद्दलचे मुस्लीम धर्मियांचे गैरसमज दूर करण्याचे भाजपने केले प्रयत्न सुरु
- २०३० पासून मिळणार नाही पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या कार्स !
- मतदार यादीतील नाव, पत्ता दुरुस्ती करण्याची संधी मिळणार
- करोनाचा धोका पुन्हा वाढला; ‘या’ शहरात कर्फ्यू लागू
- जनतेच्या मनात उत्सुकता आहे की ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय आहे ? : सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

