Share

कोणत्या नालायकाने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढलाय; मास्कची काही गरज नाही – भिडे

Published On: 

सांगली : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग फोफावत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, नियमांचे पालन न झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध देखील लावले जात आहे.

यामुळे या गंभीर स्थितीतून सावरण्यासाठी सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा काटेकोरपणे वापर करणे, हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मास्क लावणे म्हणजे मास्क लावण्याची गरज नसल्याचं वक्तव्य केलं आहे. यासोबतच पुढे त्यांनी अश्लाघ्य भाषेचा देखील वापर केला आहे.

याआधी देखील अनेक वादग्रस्त विधानामुळे संभाजी भिडे गुरुजींवर टीका करण्यात आल्या होत्या. तर त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. आता, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. कोणत्या नालायकाने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे,’ असं वादग्रस्त भाष्य भिडेंनी केलं आहे.

एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे? मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असं देखील भिडे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!