Share

‘सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद ??’: चित्रा वाघ

Published On: 

🕒 1 min read

पुणे: एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बिबवेवाडी परिसरात तीन तरुणांनी कोयत्याने वार केला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स याठिकाणी ही घटना घडली. पीडित मुलगी नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी येथे आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी तिच्यावर कोयत्याने वार केला. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत आपली प्रतिकिया दिली आहे. ‘अतिशय भयानक काय चाललयं पुण्यात कोयत्याने वार करून खून टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर पोलिस कायदे कागदावर महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद ??,’ असे म्हणत सरकारला चित्रा वाघ यांनी सवाल केला आहे.

११ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेसाठी महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने याला कडाडून टीका केली. त्यानंतर आता पुण्यासारख्या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडल्याने चित्रा वाघ यांनी आता महाराष्ट्र बंद कधी करणार? असा प्रश्न करत सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!