Share

विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर वीरेंद्र सेहवाग म्हणतो, “मला आठवत नाही त्यानं..”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विराट कोहलीचे फॉर्ममध्ये पुनरागमन आणि आयपीएल ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्रतीक्षा आणखी लांबली. गेल्या मोसमात, कोहलीचा फॉर्म परत आला नाही आणि आरसीबीलाही अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. आयपीएलचा शेवटचा हंगाम कोहलीसाठी खास नव्हता. या मोसमात कोहलीची सरासरी २२.७३ आहे, मोसमात कोहली तीन वेळा गोल्डन डकवर आऊट झाला.

कोहलीच्या शेवटच्या शतकाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अशा स्थितीत इंग्लंडचा दौरा कोहलीसाठी खूप महत्त्वाचा आणि आव्हानात्मक ठरू शकतो. कोहलीच्या फॉर्मवर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही त्याला क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता. आता या प्रकरणावर भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ”तुम्हाला आठवतंय का कोहलीने शेवटचं शतक कधी केलं होतं? मलाही आठवत नाही. त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नक्कीच मोठी धावसंख्या करायला आवडेल, जी मालिका निर्णायक आहे.”

सेहवाग पुढे म्हणाला, ”मला वाटते त्याचे वाईट दिवस संपले आहेत. आता चांगले दिवस येतील असे वाटते आणि ते सुरू झाले आहेत.” कोहलीने आयपीएलनंतर ब्रेक घेतला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो संघात नव्हता. मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!