Share

Video- कंपन्यांकडून शेतकऱ्यांना एक दमडाही मदत मिळणार नाही- शरद पवार

Published On: 

औरंगाबाद – मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. बोंडअळीमुळे हे पीक उद्ध्वस्त झाले. राज्य सरकारने जे मदतीचे पत्रक काढले ते मी वाचले. यात बियाणाच्या कंपन्या मदत करणार असे सांगितले आहे. मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कंपन्यांकडून एक दमडाही मदत मिळणार नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रेची सांगता सभा सुरु आहे. हल्लाबोल यात्रेच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख दिग्गजांनी हजेरी लावली. तसेच औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी देखील या सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

शरद पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेती उत्पादनावर दीडपट भाव देणार असं सांगितले तरी उत्पादन खर्चाची व्याख्याच बदलण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे कशाच्या आधारावर हमीभाव देणार? कर्जमाफी जशी लबाडा घरचं आवतण होती तसंच हे आश्वासन आहे.मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. बोंडअळीमुळे हे पीक उद्ध्वस्त झाले. राज्य सरकारने जे मदतीचे पत्रक काढले ते मी वाचले. यात बियाणाच्या कंपन्या मदत करणार असे सांगितले आहे. मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कंपन्यांकडून एक दमडाही मदत मिळणार नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!