Share

तुझ्यात जीव रंगला मालिकेचे शुटींग थांबवण्याची मागणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: तरुणाईच्या पसंतीला आलेली ‘झी मराठी’ वरील मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत  आहे, या मालिकेमुळे कोल्हापुरात तर चक्क वादंग उठल आहे,मालिकेचे  शुटींग कोल्हापुरातल्या ज्या गावात चालू आहे त्या गावातल्या गावकर्यांनी या मालिकेचे  शुटींग थांबवण्याची मागणी केली आहे, त्याबद्दलच निवेदन गावकर्यांनी ग्रामपंचायतीला दिले आहे.

कोल्हापुरातल्या वसगडे या गावात ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचं शुटींग केलं जातं. चित्रीकरणावेळी चाहते मोठ्या संख्येने या गावात येतात. परिणामी या ठिकाणी गर्दी होऊन गावकऱ्यांना मनस्ताप होतो, असा दावा केला जात आहे. त्याचबरोबर गावातल्या ज्या वाड्यामध्ये शुटींग चालू आहे त्या वाड्याच्या मालकाकडूनही शिवीगाळ व दमदाटी होत असल्यचा आरोप आता गावकर्यांनी केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!