🕒 1 min read
ट्विटरच्या माध्यमातून लोकांवर टीका करणारा आणि त्यातून सतत वादांमध्ये अडकणारा कमाल खान आता भारतीय खेळांडूंवरही ‘घसरला’ आहे. कमाल खान चर्चेत राहण्यासाठी नेहमीच कलाकारांवर टीका करती असतो अगदी काही दिवसापूर्वी त्याचा आणि श्रेयस तळपदेचा वाद चांगलाच रंगला होता. आता कमाल खानने कलाकारांना टार्गेटन नकरता खेळाडूना टार्गेट करीत नवीन वादाला ठिणगी दिली आहे.
शनिवारी भारत- न्युझिलंड सामन्यासाठी खेळाडूंची घोषणा करण्यात आली. जाहीर झालेल्या संघामध्ये युवराज सिंग आणि सुरेश रैना या दोन खेळाडूंचा समवेश नाही. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या दोघांचे करिअर संपवले आता कॉमेंट्री करा असा सल्लादेखील कमाल खानने दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

