🕒 1 min read
माउंट माउंगानुई (न्यूझीलंड): टीम इंडियाने 19 वर्षाखालील विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारताने झिम्बाब्वेचा तब्बल 10 विकेट्स राखून पराभव केला.झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार करून टाकलं आणि राहुल द्रविडच्या शिष्यांनी सलग तिसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे यंग टीम इंडियाची वर्ल्ड कपवरील दावेदारी आणखी भक्कम झाली आहे.
His 90* off 59 sped India to another big win – Shubman Gill is the #INDvZIM Player of the Match! #U19CWC pic.twitter.com/R4mge2w5S1
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 19, 2018
प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेला भारताने अवघ्या 154 धावांत गुंडाळलं. हे आव्हान भारताचे नवे सलामीवीर शुभमान गिल नाबाद 90 आणि हार्विक देसाईने नाबाद 56 धावा ठोकून, अवघ्या 21.4 षटकात पूर्ण केलं.या सामन्यात अनुकूल रॉयने 7.1 षटकात अवघ्या 20 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आणि झिम्बाब्वेला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने आज नवे सलामीवीर उतरवले. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा हे मागे थांबले. सलामीसीठा शुभमान गिल आणि हार्विक देसाई आले.हार्विकने 73 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावा केल्या. तर शुभमान गिलने 59 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 90 धावा कुटल्या.
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि पपुआ न्यू गिनी यांच्याविरुद्धचे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी खरं तर औपचारिकताच होती. पण, पृथ्वी शॉच्या संघाने जराही ढिलाई न दाखवता टिच्चून खेळ केला आणि दहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.दरम्यान, भारताने विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे.भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वेवर 10-10 विकेट्स राखून विजय मिळवला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
