Share

आज राज्यात १३ हजार ५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

Published On: 

मुंबई : राज्यात आज 6 हजार 17 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्याच्या दुप्पट रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. आज राज्यात 13 हजार 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 93 हजार 401 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के आहे.

राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या ही एक लाखाच्या खाली आली आहे. राज्यात सध्या 96 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात आज 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५६,४८,८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२०,२०७ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६१,७९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी नीती आयोगानंदेखील कोरोना स्थितीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. पुढील १०० दिवस देशासाठी महत्त्वाचे असतील, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तिसऱ्या लाटेचा धोका बोलून दाखवला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!