मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनच्या दंडमाफी प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी काल(२२ जाने.)राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेत यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. तसेच यासंदर्भात मंत्रीमंडळाविरोधात एफआयआरची नोंद करावी व मंत्रीमंडळ बरखास्त करावं, अशी मागणी केली आहे. दरम्यान, यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,’सरकारला दोन वर्ष झाली असून उत्तम कामकाज सुरु आहे. पुढील तीन वर्ष अजून चालेल. विरोधी पक्षाकडे काही काम नाही. खरं तर त्यांच्याकडे मोठी ताकद आहे, त्यांनी जर विधायक काम केलं तर ते लोकशाहीत उत्तम काम करु शकतात. पण वेळ घालवण्यासाठी त्यांच्याकडे दुसरं काहीच साधन नसल्याने अशा प्रकारचे उद्योग करत असतात.’
दरम्यान, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की,’राज्यपालांकडे आम्ही आज निवदेन सादर केले आहे. तसेच आम्ही त्यांना म्हणालो की,’तुमच्या समोर घेतलेल्या शपथीचा भंग झालेला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत.’ तसेच बरोबरीने आम्ही लोकायुक्तांची देखील वेळ मागितलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे नवीन लोकायुक्त हे अजून रूजू झालेले नाहीत आणि उपलोकायुक्तांना आज सुट्टी होती. त्यामुळे सोमवारी आम्ही उपलोकायुक्तांना भेटून हे निवेदन देणार आहोत,असेही पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- “आर.आर.आबांच्या स्वप्नांना तिलांजली”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून चित्रा वाघ आक्रमक
- “…त्यानंतरच गोळया झेलण्याच्या वल्गना करा”, श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्यावर राजू पाटलांचे टीकास्त्र
- नवनीत राणा सेलिब्रिटी, त्या दिवसभर राज्य सरकारवर टीका करुन नौटंकी करतात-मनिषा कायंदे
- “…हे विरोधी पक्षाच्या बिघडलेल्या प्रकृतीचं लक्षण आहे”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

