टीम महाराष्ट्र देशा : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणी वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येणार असल्याचा सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तसेच मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी जमीन देण्यात येईल. अएची न्यायालयाने जाहीर केले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
” सर्वोच न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा सन्मान करत आपण परस्परात सदभावना राखायला हवी. आपण भारतीयांनी बंधुत्व, विश्वास आणि प्रेम निर्माण करण्याची हीच ती वेळ आहे.” या शब्दात राहुल गांधी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सुप्रीम कोर्ट ने अयोध्या मुद्दे पर अपना फैसला सुना दिया है। कोर्ट के इस फैसले का सम्मान करते हुए हम सब को आपसी सद्भाव बनाए रखना है। ये वक्त हम सभी भारतीयों के बीच बन्धुत्व,विश्वास और प्रेम का है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 9, 2019
दरम्यान, देशभरातून लोक प्रतिनिधींनी न्यायालयाच्या निर्णयावर शांतता राखण्याचे आवाहन केले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून या खटल्याल्याच्या निर्णयाचे वाचन करीत होते. न्या. गोगोई यांच्याव्यतीरिक्त या प्रकरणाच्या संविधान पीठात न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस.ए. नजीर यांच्या खंडपीठाने हा निर्णय एकमताने दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1193096271499710470?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1193098186262368257?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

