Share

ऑस्ट्रेलियाच्या आगामी बांग्लादेश दौऱ्यात करण्यात आला ‘हा’ बदल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारतात आयोजीत टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघानी कंबर कसली आहे. या स्पर्धेच्या उद्देशाने अनेक संघ टी-२० मालिका खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे बीसीसीआय आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आधी आयोजीत करण्याच्या तयारीत आहे.

यादरम्यान बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने याच दिशेने पाऊल उचलत मायदेशातील आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत बदल केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. यानंतर ते थेट बांग्लादेशच्या दौऱ्यावर येतील. या दौऱ्यात पुर्वनियोजीत कार्यक्रमानुसार ३ टी-२० सामने होणार होते. मात्र आता या सामन्याची संख्या ३ वरुन वाढवत ५ करण्यात आली आहे. त्यामुळे बांग्लादेशच्या संघाला आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर अधिक टी-२० सामने खेळण्याची संधी मिळेल.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेही या दौऱ्यास सहमती दर्शवली आहे. यादरम्यान भारतात आयोजीत टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर कोरोना परिस्थीतीमुळे टांगती तलवार आहे. जर कोरोना परिस्थीती सुधारली नाही तर ही स्पर्धा युएईमध्ये आयोजीत केली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!