Share

‘तेव्हा तर मी…’, लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशिषचे उत्तर

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश : लखीमपूर हिंसाचार परकरणी दोन समन्स पाठविल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर झाला. यावेळी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने शेतकऱ्यांना थार गाडीने चिरडले तेव्हा कुठे होतास? असा प्रश्न विचारला. यावर आशिषने त्यावेळी आपण कुस्ती बघायला गेलो होतो असे उत्तर दिले.

कुस्तीचे ठिकाण घटना घडली त्या ठिकाणाहून ४-५ किलोमीटर आहे. परंतु आशिषचे मोबाईल लोकेशन घटनास्थळा जवळीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशिषने एसआयटीच्या चौकशीत सहकार्य केले नाही. यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे.

दरम्यान, हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मिश्रा यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात बोलतांना शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की,’मुलाला अटक आणि तरीही वडील मंत्रिपदावर कायम कसे?’ तसेच माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह म्हणाले की, ‘आरोपी आशीष मिश्रा उर्फ मोनूला शिक्षा होण्यासाठी मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवले पाहिजे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!