Share

वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जग भारताकडे आकृष्ट – मुख्यमंत्री

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्र ऊभारणीत उद्योग क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. यातूनच वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जग भारताकडे आकृष्ट होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ईवाय प्रस्तुत ईवाय एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर 2018 हे पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यामध्ये ज्येष्ठ उद्योजक विप्रो समुहाचे प्रमुख अझीम प्रेमजी यांना जीवन गौरव पुरस्कार तर आयशर मोटर्सचे सिद्धार्थ लाल यांना एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीत खंबीर नेतृत्व म्हणून कामगिरी बजावत असल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचेही उद्योजकांच्यावतीने उभे राहून, टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक राजीव मेहरोत्रा, उदय कोटक आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत हा वेगाने विकसित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक आहे. देशाची आर्थिक विकासाची वाटचालही गेल्या काही वर्षात वैशिष्ट्यपूर्ण अशीच राहिली आहे. त्यामुळे विकासाच्या वाटचालीबाबत जगाची भारतावर नजर आहे. या वाटचालीत उद्योजकांनीच आपल्या धडाडीने मोठे योगदान दिले आहे. भारताच्या आर्थिक विकासाची वाटचालीत गत चार वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली धाडशी निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामुळेही उद्योग क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. त्यातूनही मोठे परिवर्तन घडते आहे. जीएसटी कर प्रणाली, दिवाळखोरीबाबतची संहिता अशा सुधारणावादी योजनांमुळे एकूणच अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणली गेली आहे. “ईझ ऑफ डुइंग” बिझनेस या धोरणामुळे जगभरातील ग्लोबल सप्लाय चेनचेही भारतीय उद्योग जगताकडे लक्ष लागून राहिले आहे. यातून भारत गुंतवणुकदारांसाठीही महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. त्यातही विशेषत: महाराष्ट्रात सर्वात मोठी गुंतवणूक येते आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना देण्याचे धोरण निर्धारित केले आहे. त्यामुळे या क्षेत्रातही अभुतपूर्व अशी गुंतवणूक आली आहे. यामुळे एकूणच उद्योग जगताचे चित्र बदलते आहे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यादृष्टीने असे पुरस्कार उद्योजकांना प्रोत्साहित करणारे ठरतील, असा विश्वास वाटतो, असेही ते म्हणाले.

विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यातून, त्यांच्या मानवतेच्या क्षेत्रातील कार्याचाही गौरव झाल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

या सोहळ्यात इनोव्हेटीव्ह स्टार्टअप संवर्गात बायजूच्या रवींद्र बायजू, कंझ्युमर प्राॅडक्ट अॅण्ड रिटेलमध्ये जग्वार समुहाचे राजेश मेहरा, मॅन्युफ्क्चरिंगमध्ये मिंडा इंडस्ट्रीजचे निर्मल मिंडा, लाईफ सायन्स अँण्ड हेल्थ केअरमध्ये इन्टास फार्मास्युटीकलचे दिनेश चुदगर, फायनान्शीअल सव्हिर्सेसमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक संजय अगरवाल, सर्व्हिसेसमध्ये ओयोचे रितेश अगरवाल, एनर्जी अँण्ड इन्फ्रास्टक्चर्समध्ये फिनिक्स मिल्सचे अतुल रूईया, एन्टरप्र्येन्युअल सीईओसाठी टायटनचे भास्कर भट्ट, बिझनेस ट्रान्सफर्मेशन संवर्गामध्ये फ्युचर्स समुहाचे किशोर बियाणी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!