🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनने नुकतीच वयाची चाळीशी पूर्ण केली आहे. विद्याचा जन्म 1 जानेवारी 1978ला केरळमध्ये झाला. ती लहानाची-मोठी मुंबईमध्ये झाली. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
एकेकाळी मल्याळम सिनेमांमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणा-या विद्याचे एक दोन नव्हे तर तब्बल 12 सिनेमे डबाबंद झाले होते. त्यानंतर विद्याने तामिळ सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला.
काही सिनेमेसुद्धा साइन केले. मात्र सिनेमाचे शूटिंग पूर्ण करुनदेखील तिला नंतर रिप्लेस करण्यात आले. याकाळात ती काही जाहिरातींमध्ये झळकली.
सिनेमांमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणा-या या तरुणीला वयाच्या 16 व्या वर्षी हम पांच या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. टीव्ही इतिहासातील ही एक गाजलेली मालिका ठरली.
जवळजवळ 11 वर्षे ही मालिका चालली. एकता कपूरच्या या शोनंतर अनुराग बसूंनी देखील विद्याला एक मालिका ऑफर केली होती. मात्र सिनेमांमध्ये काम करण्यासाठी तिने ती नाकारली.
2005 मध्ये विद्याला प्रदीप सरकार यांच्या परिणीतामध्ये मोठी संधी मिळाली. मात्र या सिनेमासाठी तिला सहा महिने ऑडिशन द्याव्या लागल्या होत्या. हा विद्याचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. 
या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
विद्याचे फिल्मी करिअर
परिणीता (2005), लगे रहो मुन्नाभाई (2006), गुरु (2007), सलाम-ए-इश्क (2007), हे बेबी (2007), पा (2009), इश्किया (2010), नो वन किल्ड जेसिका (2011), द डर्टी पिक्चर (2011), कहानी (2012), घनचक्कर (2013), शादी के साइड इफेक्ट्स, बॉबी जासूस (2014), तुमारी सुलू (2016)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

