🕒 1 min read
मुंबई : ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात थांबावा यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
देशात जवळपास नव्या कोरोनाचे २० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, हवाई सेवा बंद होण्याआधी राज्यात देखील परदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. त्यामुळे त्यांची माहिती घेऊन चौकशी करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुरुवातीला ३१ मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर जूनपासून टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली होती.
राज्य सरकारने ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी पावले उचलले होते. या मिशन बिगिन अगेन ची नियमावली ३१ जानेवारी २०२१ मध्ये देखील कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नववर्षात देखील या नियमांचं पालन करावं लागणार आहे.
राज्य शासनानं याबाबत आदेशही जारी केले आहेत. कम्टेन्मेंट झोनमधील निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. तसेच आपत्कालीन सर्व नियमावली आधीच्या लागू राहतील, असं सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केजरीवाल सरकार देणार फ्री Wi-Fi सुविधा
- पुण्यामध्ये गव्या नंतर हरणांच्या कळपांचे आगमन
- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करा : नीलम गोऱ्हे
- शेतकरी आंदोलनावरून कुमार विश्वास यांनी साधला मोदि सरकारवर निशाणा
- आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
