🕒 1 min read
मुंबई : यंदा संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. अशातच राज्यात परतीचा पाऊस, कीड, अतिवृष्टी, आदी संकटांची भर पडत आहे. तर, नुकतीच अवघी मुंबई वीजसंकटात सापडल्याच पाहायला मिळालं. यातच काही दिवसांपूर्वी मुंबईसह उपनगरामध्ये अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली. सर्वसामान्य लोकांपासून ते जवळपास सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
मुंबईसह उपनगरांमध्ये १२ ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा खंडित झाला होता.दरम्यान, यानंतर वीज पुरवठा खंडित होण्याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केलं.सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज गेल्याचं ऊर्जामंत्र्यांसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणात ऊर्जामंत्र्यांनी ट्विट करत नवी खळबळ उडवून दिली .
The possibility of foul play/sabotage can't be denied in the power outage incident of Mumbai, Thane and Navi Mumbai on Monday: Maharashtra Energy Minister Nitin Raut pic.twitter.com/wfUw44RAmR
— ANI (@ANI) October 14, 2020
“सोमवार दिनांक १२.१०.२०२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असं ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.
दरम्यान, आता या संदर्भात कोणताही घातपात किंवा सायबर हल्ला झाला नसल्याचा निर्वाळा चौकशी समितीने आपल्या अहवालात दिला आहे. तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईचे विद्युत अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी. जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती.हिंदुस्थान समाचारने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपाबद्दलचे मुस्लीम धर्मियांचे गैरसमज दूर करण्याचे भाजपने केले प्रयत्न सुरु
- २०३० पासून मिळणार नाही पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या कार्स !
- मतदार यादीतील नाव, पत्ता दुरुस्ती करण्याची संधी मिळणार
- करोनाचा धोका पुन्हा वाढला; ‘या’ शहरात कर्फ्यू लागू
- जनतेच्या मनात उत्सुकता आहे की ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय आहे ? : सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

