Share

पुणे ते सातारा मर्सिडीजचा प्रवासही ट्रॅक्टरने केल्यासारखा वाटतो; ‘टोलधाडी’वर शेट्टींचा प्रहार

Published On: 

कोल्हापूर : देशातील सर्वच टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर आता पुणे-बेंगलुरू महामार्गावरील टोल वसुलीमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल पासून या महामार्गावरील टोलमध्ये 5% वाढ करण्यात आली आहे. पुणे-सातारा दरम्यानच्या आणेवाडी आणि खेड शिवापूर या टोलनाक्यांवरील टोल दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

यामुळे, वाहनधारकांना अधिकचा फटका बसणार आहे. तर, या टप्प्यातील महामार्गाची अवस्था ही दयनीय असून गेल्या दहा वर्षांपासून महामार्ग रुंदीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे, वाहनचालकांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून अपघटनाचे प्रमाण देखील वाढत आहे. अशा स्थितीतही टोल दारात वाढ केल्याने आता संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील टोलधाडीवर संताप व्यक्त केला आहे. ‘कागल ते बेळगाव प्रवासात कोगनोळी टोलनाक्यावर कार व जीपसाठी टोल आकार ७५ रूपये आहे. पुणे ते कागल महामार्गावर कामे अपूर्ण तरी खेड शिवापूर टोल नाक्यावर कार व जीपसाठी टोल आकार ९५ वरून १०० रूपये करण्यात आला आहे.’

पुढे ते म्हणतात, ‘कागल ते बेळगाव जीपने प्रवास केल्यास मर्सिडीजने प्रवास केल्यासारखे वाटते. मात्र पुणे ते सातारा मर्सिडीजने प्रवास केल्यास ट्रॅक्टरने प्रवास केल्यासारखे वाटते. पुणे ते सातारा हा रस्ता रिलायन्सने केला आहे व टोलही रिलायन्सच वसूल करते. इतके लाड कशासाठी रिलायन्स जिंदाबाद “करलो दुनिया मुठ्ठी मे” ‘ अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!