Share

राज्यकारभार ढिसाळ, गचाळ व बेफिकिरीने सुरु, शिवसेनेची सरकारवर टीका

Published On: 

मुंबई: मराठीचा अवमान होत असताना शिवसेना सत्तेच्या लाचारीपायी सभागृहात गप्प बसली, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी होती. दरम्यान शिवसेनेनं ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या भाषणाचा अनुवाद मराठीत न झाल्यामुळे आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विधीमंडळात राज्यपालांचं अभिभाषणाचा अनुवाद मराठीत ऐकू न आल्यानं आता शिवसेनेनं ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

राज्यकारभार किती ढिसाळ, गचाळ व बेफिकिरीने सुरु आहे त्याचाच हा उत्तम नमुना आहे.’ अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाषणाचा अनुवाद गुजरातीतून ऐकू आल्याचा विरोधकांचा आरोप खरा नाही. असं म्हणत सेनेनं भाजपची काहीशी पाठराखणही केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!