मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले ४ मे रोजी परमबीर सिंह यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासोबतच, आपल्यावर झालेले आरोप हे खोटं असल्याचं सांगत महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आता सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात दाखल केलेला गुन्हा महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच असल्याचा आरोप राज्य सरकारने देखील केला असून सीबीआयच्या एफआयआरमधील दोन भाग वगळण्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच, सीबीआय हायकोर्टानं दिलेल्या निर्देशांच्या पलिकडे जाऊन तपास करू पाहतंय, असा ठपका देखील राज्य सरकारने ठेवला आहे.
राज्य सरकारचा काय आक्षेप ?
सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेणं आणि काही पोलीस अधिका-यांच्या बदल्यांबाबत सीबीआयच्या एफआयआरमध्ये असलेल्या उल्लेखावर राज्य सरकारने आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मे महिन्याच्या शेवटी होणार पोलीस भरती; राज्य सरकारच्या आधीच महाराष्ट्र पोलिसांची घोषणा
- विखेंच्या रेमडेसिवीर खरेदी प्रकरणी पोलिसांनी स्वतंत्रपणे तपास करावा; न्यायालयाचे आदेश
- मराठा आरक्षणाचा कायदा हा केवळ समन्वयाच्या अभावातून रद्द झाला, फडणवीसांचा सरकारला टोला
- मे महिन्याच्या शेवटी होणार पोलीस भरती; राज्य सरकारच्या आधीच महाराष्ट्र पोलिसांची घोषणा
- कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवा; सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा आहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

