मालेगाव : भारतीय सीमेवर गलवान घाटी, लडाख येथे चिनसोबतच्या युद्धात २० वीर जवान शहीद झाले त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मालेगाव शहर शाखेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ही श्रद्धांजली चीनच्या वस्तूंचा बहिष्कार करून नागरिकांनी खऱ्या अर्थाने वहावी असे आव्हान अभाविप कडून करण्यात आले..!
भारत-चीन सीमा वादामध्ये केंद्र सरकारची भूमिका दुर्भाग्यपूर्ण – आप
अभाविपने जम्मू ते कन्याकुमारी संपूर्ण भारत भरात चीनच्या वस्तूंचा, चीनचा आणि चिनी विचारधारा असलेल्या कम्युनिस्ट विचारांचा नायनाट करण्याची शपथ घेतील आहे. संपूर्ण भारत देशात अभाविप भारतीय सेनेच्या सोबत ठामपणे उभी आहे.
यावेळी अभाविप मालेगावचे शहर मंत्री कामेश गायकवाड, मालेगाव सहशहर मंत्री शिवदास सूर्यवंशी, विध्यार्थीनी कार्यकर्ती प्राजक्ता बच्छाव, स्वराज निकम, यशवंतराव मोरे, तन्मय वाघ, कुणाल वडगे आणि पूर्णवेळ मालेगाव शहर विस्तारक सचिन लांबूटे तसेच सामान्य नागरिक आदी उपस्थित होते.
परदर्शकतेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सचिन लांबूटे यांनी “वह बर्बर था वह अशुद्ध था, हमने उसे शुद्ध किया, हमने उसको बुद्ध दिया उसने हमको युद्ध दिया। या युद्धाला जवान सीमेवर लढा देत आहेत तर आपण सामान्य नागरिक म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्कार करून आपले कर्तव्य पार पडावे असे अवाहन केले. हा बहिष्कार खऱ्या अर्थाने शहीद जवानांना श्रद्धांजली ठरेल”असे म्हंटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

