औरंंगाबाद : रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत बुडून २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दिपक सुभाष मुळे (वय २८,रा.लांजी,ता.गंगापूर) असे मयत युवकाचे नाव आहे.
गुरूवारी सकाळपासून घरातून बेपत्ता असलेल्या दिपक मुळे याचा मृतदेह लांझी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत तरंगत होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे ड्युटी इंचार्ज मोहन मुंगसे, लक्ष्मण कोल्हे, इत्तहाक शेख, प्रसाद शिंदे, तुषार तौर, सय्यद सईद आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
जेसीबी आणि दोरीच्या सहाय्याने दिपक मुळे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढुन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात दाखल केला. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा निर्धार; रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

